विशेष प्रतिनिधी
बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. लोकवर्गणी काढून देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात आहे. माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, माजलगाव मतदारसंघाच्या वतीने देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून 44 लाख 13 हजार 488 रुपये जमा करून दिले आहेत.
अजून तीन ते चार दिवसांमध्ये लोक निधी गोळा करत आहेत. ते झाले की आम्ही आणून देणार आहोत”, अशी माहिती प्रकाश सोळंके यांनी दिली.
हत्येच्या घटनेला आता जवळपास 25 दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरीही या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहे. त्यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी बजावण्यात आली आहे. या प्रकरणी सीआयडीचा विविध पथकांच्या माध्यमातून तपास सुरु आहे. ही घटना प्रचंड भयंकर आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे.
याबाबत प्रकाश सोळंके म्हणाले.
आरोपींना अजूनही अटक झालेली नाही हे दुर्दैवी आहे. तसेच पोलीस यंत्रणा आणि तपास करणाऱ्या यंत्रणालाचं हे अपयश आहे असं मी मानतो. उद्या मी मुंबईला जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर देखील हा सगळा वृत्तांत घालणार आहे. दुर्दैवी आहे, बीड जिल्ह्यामधील पोलीस यंत्रणा संबंध उलटून गेलेली आहे.
दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांची जिल्ह्यातून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी करणार आहोत. निश्चितपणाने नवीन एसपी आल्याने एक शिस्तीचं वातावरण तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यांचा तसा प्रयत्न चालू आहे. सर्वांनी त्यांना सहकारी केलं पाहिजे. एका दिवसामध्ये काही बदल होत नसतो. गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली कीड आहे. ही कीड काढायची असेल तर काही कालावधी त्यांना द्यावा लागेल. वेळोवेळी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात राहून या तपासात वेग मिळावा असा आमचा प्रयत्न आहे”, असं प्रकाश सोळंके म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails