मुंबई : पौड (मुळशी) येथील अन्नपूर्णा देवी मंदिरातील मूर्ती विटंबना प्रकरणावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अगदी रशिया-युक्रेन युद्धावर तावातावाने मते मांडणाऱ्या सुळे यांनी आपल्या मतदारसंघात घडलेल्या गंभीर घटनेवर केवळ चार ओळींचे ट्वीट करून आरोपीचं नावही घेतलं नाही,” असा सवाल करत चित्रा वाघ यांनी तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. ( You used to express your opinions in a heated manner why are you silent now Chitra Wagh attacks Supriya Sule over Annapurna Devi idol desecration)
मुळशी तालुक्यातील पौड गावातील नागेश्वर मंदिरात शुक्रवारी एका समाजकंटकाने अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केली. १९ वर्षीय चांद नौशाद शेख या तरुणाने मंदिरात घुसून मूर्तीशी अभद्र कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी शेख आणि त्याच्या वडिलांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘X’ या सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. पौड गावातील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात एका तरुणाने गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे. कोणतीही संवेदनशील व्यक्ती हे कदापि सहन करणे शक्य नाही. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या तरुणावर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी. सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफी मिळता कामा नये, अशी आमची भूमिका आहे.असे त्यांनी म्हटले, मात्र त्यांनी पोस्टमध्ये आरोपीचे नाव घेतले नाही.यावरून आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. एरवी तुम्ही प्रचंड संवेदनशील आहात असा आव आणता…अगदी रशिया युक्रेन युध्दावर तुम्ही तावातावाने मतं मांडता पण तुमच्या मतदारसंघात म्हणजे मुळशी तालुक्यातील पौड गावात जो घृणास्पद आणि संतापजनक प्रकार घडला त्यावर चार ओळींचे ट्विट टाकून गप्प आहात? त्या हरामखोरानं नागेश्वर मंदिरात घुसून अन्नपूर्णा मातेवरवर अतिप्रसंग केला नाही, तर समस्त हिंदू महिलांना एक चेतावणी दिली आहे. हे तुम्हाला कळलं असेलच… पण तरीही त्या नीच आणि विकृत चाँद शेखचे तुम्ही नावही घेत नाही? तुष्टीकरणाचं राजकारण सुचतंय का..?तुमच्या मतदार संघात दहशतवादी वृत्तीची ही पिल्लावळ आहे… त्यांच्या आणि पहलगाव मधल्यादहशतवाद्यांमध्ये काडीचाही फरक नाही…
त्या विकृत लांडग्यांना देवाभाऊ चांगलीच अद्दल शिकवतीलच पण तुम्हाला मात्र समस्त हिंदू समाज कधीही माफ करू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.