विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्लीच्या लोकांना हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधून पाणी प्यायला मिळतं. यमुना ही हरियाणातून दिल्लीमध्ये येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुना नदीत विष कालवल्यामुळे ती प्रदूषित केल्याचा बेछूट आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
भाजपवर टीका करताना केजरीवाल म्हणाले की यमुना नदी प्रदूषित व्हावी म्हणून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी जैविक शस्त्रांचा वापर केला आहे. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता निर्माण झाली असून भाजपने हे कारस्थान जाणीवपूर्वक केल्याचा दावा केजरीवालांनी केला. यमुना नदीच्या स्वच्छतेवर आम आदमी पक्षाच्या नेत्यांना सवाल केला असता, अरविंद केजरीवाल यांनी हा अजब दवा केला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने यमुना नदीच्या स्वच्छतेवर कोट्यवधी रूपये खर्च केले
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदाना करिता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे दिल्लीतील प्रचार जोर धरू लागला आहे. या दरम्यानच आम आदमी पक्ष, भाजप, काँग्रेस यांच्यात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेता आणि उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पत्रकार परिषदेत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले की , “अरविंद केजरीवाल घाबरले आहेत, आप पक्षाकडून ५००-५०० रुपयांचे वाटप केले जात आहे.”