DCNMaharashtra.com
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • खेळ
  • आरोग्य
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • पुणे
No Result
View All Result
SUBSCRIBE
DCNMaharashtra.com
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • खेळ
  • आरोग्य
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • पुणे
No Result
View All Result
DCNMaharashtra.com
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • खेळ
  • आरोग्य
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • पुणे
Home राष्ट्रीय

पाकिस्तान आणखी दहशतवादी हल्ले घडवून आणणार असल्याची माहिती मिळाल्यानेच राबवले ऑपरेशन सिंदूर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केली भूमिका

dcn_maharashtra by dcn_maharashtra
May 7, 2025
in राष्ट्रीय
0
पाकिस्तान आणखी दहशतवादी हल्ले घडवून आणणार असल्याची माहिती मिळाल्यानेच राबवले ऑपरेशन सिंदूर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केली भूमिका
74
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विशेष प्रतिनिधी

You might also like

बिहार विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; दोन टप्प्यांत मतदान, निकाल १४ नोव्हेंबरला.

एमपीएससीची २८ सप्टेंबरची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख ९ नोव्हेंबर जाहीर.

ट्रम्प यांच्या 100% आयात करामुळे भारतीय औषध कंपन्यांच्या समभागात तीव्र घसरण.

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरून आणखी हल्ले घडवून आणले जाणार आहेत, अशी विश्वसनीय गुप्त माहिती भारताला मिळाली होती.त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या आत्मरक्षणाच्या अधिकाराचा वापर करून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवle. ही कारवाई अत्यंत संयमित, नियोजित आणि जबाबदारीने करण्यात आली असून तिचा उद्देश केवळ दहशतवाद्यांची पायाभूत रचना उद्ध्वस्त करणे हाच होता, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले. ( Operation Sindoor was launched after receiving information that Pakistan was planning to carry out more terrorist attacks Foreign Secretary Vikram Misri clarified his position)

 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा बळी गेला. या अमानुष हल्ल्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले असून, भारताने या घटनेची गंभीर दखल घेत पाकिस्तानविरोधात निर्णायक भूमिका घेतली आहे. बुधवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपली ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली.

मिस्री यांनी सांगितले की, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी केवळ निर्दोष पर्यटकांची हत्या केली नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या झाडत त्यांना धमकी दिली की हा संदेश संपूर्ण देशात पसरवावा. या हल्ल्याचा उद्देश केवळ जिवे मारणे नव्हता, तर काश्मीरमध्ये असलेल्या शांतता, पर्यटन आणि विकास प्रक्रियेला उध्वस्त करणे हा होता. गेल्या वर्षी सव्वा दोन कोटीहून अधिक पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते, ही गोष्ट पाकिस्तानला खटकत होती.

या हल्ल्याची जबाबदारी ‘द रिसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेने स्वीकारली आहे. TRF ही संघटना संयुक्त राष्ट्राने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या लष्कर-ए-तोयबा या गटाशी थेट संबंधित आहे. मिस्री म्हणाले की, TRF हे फक्त एक मुखवटा आहे, आणि त्यामागे लष्कर, जैश आणि इतर पाकपुरस्कृत संघटना कार्यरत आहेत. सोशल मीडियावरील पोस्ट्स आणि तपासातून TRF व लष्कर यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. हल्लेखोरांची ओळख पटली असून, त्यांचे थेट पाकिस्तानाशी असलेले संबंधही स्पष्ट झाले आहेत.

भारताने ही घटना केवळ एक हल्ला म्हणून न पाहता, पाकिस्तानच्या नियोजित सीमा-पार दहशतवाद धोरणाचा भाग म्हणून पाहिले आहे. मिस्री यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानने आजवर फक्त नकार, आरोप-प्रत्यारोप आणि भाष्य केलं, पण दहशतवाद्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलटपक्षी, दहशतवाद्यांना संरक्षण, प्रशिक्षण व अर्थसहाय्य देऊन त्यांना भारतात पाठवण्याचं काम ते सातत्याने करत आले आहेत.

या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले संबंध पुनरावलोकन करत काही कठोर राजनैतिक निर्णय घेतले आहेत. मिस्री म्हणाले की, भारताला विश्वसनीय गुप्त माहिती मिळाली होती की पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरून आणखी हल्ले घडवून आणले जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या आत्मरक्षणाच्या अधिकाराचा वापर करून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. ही कारवाई अत्यंत संयमित, नियोजित आणि जबाबदारीने करण्यात आली असून तिचा उद्देश केवळ दहशतवाद्यांची पायाभूत रचना उद्ध्वस्त करणे हाच होता.

संयुक्त राष्ट्रसंघानेही पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींना जबाबदार धरण्याचे आवाहन केले आहे. मिस्री यांनी सांगितले की, भारताची भूमिका आता अधिक ठाम आहे. “आम्ही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही.”
पाकिस्तानच्या भूमीवरून उगम पावणाऱ्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्धार भारताने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर व्यक्त केला आहे.

Tags: "counter-terrorism"Cross-Border TerrorismDefense StrategyGlobal TerrorismIndiaIndia-Pakistan RelationsIndian ArmyIndian Foreign PolicyJammu and KashmirKashmir TourismLashkar-e-Taibanational securityOperation SindoorPahalgam AttackPakistansurgical strikeTerror AttackTRFunited nationsVikram Misri
Share30Tweet19
dcn_maharashtra

dcn_maharashtra

Recommended For You

बिहार विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; दोन टप्प्यांत मतदान, निकाल १४ नोव्हेंबरला.

by Aajam Pathan
October 6, 2025
0
Bihar Assembly Elections: Two Phases, Nov 14 Results

भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) बिहार विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणुका दोन...

Read moreDetails

एमपीएससीची २८ सप्टेंबरची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख ९ नोव्हेंबर जाहीर.

by Aajam Pathan
September 26, 2025
0
MPSC State Services Exam Postponed from September 28 to November 9

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने यासंबंधी अधिकृत घोषणा केली असून, ही परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५...

Read moreDetails

ट्रम्प यांच्या 100% आयात करामुळे भारतीय औषध कंपन्यांच्या समभागात तीव्र घसरण.

by Aajam Pathan
September 26, 2025
0
ट्रम्प यांच्या 100% आयात करामुळे भारतीय औषध कंपन्यांच्या समभागात तीव्र घसरण.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी अमेरिकेत आयात होणाऱ्या ब्रँडेड आणि पेटंटेड औषधांवर 1 ऑक्टोबर 2025 पासून 100% आयात कर जाहीर केला. यामुळे भारतीय औषध...

Read moreDetails

सायबरहल्ल्याचा फटका : Tata Motors चा शेअर 2.83% घसरला

by Aajam Pathan
September 25, 2025
0
Cyberattack Blow: Tata Motors Stock Falls 2.83%

वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी Tata Motors ला शेअर बाजारात मोठा फटका बसला आहे. कंपनीचा शेअर 2.83% नी घसरून ₹663.60 वर बंद झाला. ही घसरण युरोपमधील उपकंपनी Jaguar...

Read moreDetails

GST-2.0 नंतर FMCG वस्तूंच्या किमती घसरल्या; पण ग्राहक अडकले सुट्ट्या पैशांच्या जाळ्यात

by Aajam Pathan
September 24, 2025
0
After GST-2.0, FMCG prices fall; but consumers trapped in the change-money dilemma.

देशभरात लागू झालेल्या GST 2.0 करसुधारणांमुळे अनेक FMCG . कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीत लक्षणीय घट करायला सुरुवात केली आहे. या किमती कमी झाल्याने ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार असला,...

Read moreDetails
Next Post
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नऊ दहशतवादी केंद्रांवर अचूक हल्ला, लष्कर आणि वायुदलाची संयुक्त माहिती

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नऊ दहशतवादी केंद्रांवर अचूक हल्ला, लष्कर आणि वायुदलाची संयुक्त माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

Maharashtra government lifts ban on sale and consumption of liquor in dams and backwater areas, changing 5-year-old policy

महाराष्ट्र सरकारने बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरातील दारू विक्री आणि पिण्यावरील ५ वर्षे जुनी नीति बदलून बंदी उठवली

October 10, 2025
Bihar Assembly Elections: Two Phases, Nov 14 Results

बिहार विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; दोन टप्प्यांत मतदान, निकाल १४ नोव्हेंबरला.

October 6, 2025
MPSC State Services Exam Postponed from September 28 to November 9

एमपीएससीची २८ सप्टेंबरची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख ९ नोव्हेंबर जाहीर.

September 26, 2025
ट्रम्प यांच्या 100% आयात करामुळे भारतीय औषध कंपन्यांच्या समभागात तीव्र घसरण.

ट्रम्प यांच्या 100% आयात करामुळे भारतीय औषध कंपन्यांच्या समभागात तीव्र घसरण.

September 26, 2025
Cyberattack Blow: Tata Motors Stock Falls 2.83%

सायबरहल्ल्याचा फटका : Tata Motors चा शेअर 2.83% घसरला

September 25, 2025
After GST-2.0, FMCG prices fall; but consumers trapped in the change-money dilemma.

GST-2.0 नंतर FMCG वस्तूंच्या किमती घसरल्या; पण ग्राहक अडकले सुट्ट्या पैशांच्या जाळ्यात

September 24, 2025
Historic Surge in Car Sales on Day 1 of GST-2.0 and Navratri

नव्या GST नियमांचा झणझणीत परिणाम ! GST-2.0 आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कार विक्रीत ऐतिहासिक उंची

September 23, 2025
Trump’s $100,000 Fee on H-1B Visas: A Major Crisis for Indian Workers

ट्रम्पचा $100,000 शुल्क निर्णय: H-1B व्हिसा धारकांसाठी गंभीर संकट

September 20, 2025
New U.S. Blow to H-1B Visa: $100,000 Annual Fee; Major Hit to Indian IT Companies

H-1B व्हिसावर अमेरिकेचा नवा दणका – दरवर्षी $100,000 शुल्क; भारतीय IT कंपन्यांना मोठा फटका

September 20, 2025

© 2025

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • खेळ
  • आरोग्य
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • पुणे

© 2025