विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीमुळे या योजनेत अपात्र असलेल्या पाच लाख महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा निधी देण्यात आला होता. या पाच लाख अपात्र महिलांना 450 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ही रक्कम परत घेतली जाणार नाही. त्यामुळे 450 कोटी रुपयांचा फटका सरकारला बसला आहे.
नवीन सरकार आल्यावर या योजनेत अपात्र असलेल्या महिलांची छननी करण्यात आली. त्यानंतर लाभार्थींची संख्या पाच लाखांनी कमी होऊन 2.41 कोटींवर आली आहे. डिसेंबर 2024 मध्ये ही संख्या 2.46 कोटी होती. ही विधानसभा निवडणुकीसाठी करदात्यांच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच होती, असा आरोप करत महायुतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
लाडक्या बहिणींच्या यादीत कपात झाल्यावर राजू शेट्टी मानले, हे असं होणारच होतं. ते लोकांच्या आता लक्षात आलं आहे. ही विधानसभा निवडणुकीसाठी करदात्यांच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच होती, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी बहिणी, आनंदाचा शिधा वा इतर सुरू करण्यात आलेल्या योजना, मतदारांना दिलेली लाच होती आणि ती तेवढ्या काळापुरती होती. राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे, हे माहिती असताना सुद्धा त्यावेळचे मुख्यमंत्री, मंत्री यांनी विधानसभा निवडणुकीत जनतेची मतं घेण्यासाठी हा बनवा केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला
. या फसवणुकीविरोधात महायुतीमधील नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी जोरदार मागणी राजू शेट्टी यांनी केली. या योजनेतून पाच लाख महिला गायब झाल्या आहेत. अजून किती बहिणी गायब होतील हे समोर येईलच असे ते म्हणाले. एकूणच लाडकी बहीण योजनेतील कारवाईवरून आता नाराजीचा सूर आवळल्या जात असल्याचे समोर येत आहे. बनाव
विधानसभेवेळी तर निकषात न बसलेल्या पाच लाख महिलांच्या खात्यात सुद्धा रक्कम जमा करण्यात आली. आता अपात्र महिलांची छाननी करण्यात आली. त्यात लाभार्थ्यांची संख्या घटली. डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी महिला पात्र होत्या. तो आकडा आता 2.41 कोटींवर आला. सरकारची मोठी रक्कम वाचली आहे.